पहलगाम परिसरात उद्भवलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाणारी विशेष रेल्वे सेवा (गाडी क्र. 04612) सुरू करण्यात आली आहे.
प्रस्थान वेळा:
कटरा – रात्री 21:20
उधमपूर – रात्री 21:48
जम्मू – रात्री 23:00
नवी दिल्ली आगमन सकाळी 09:30
तिकिट उपलब्धता:
कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकांवर
या विशेष रेल्वेमुळे अतिरिक्त गर्दीचा भार कमी होण्यास मदत होणार असून, अडकलेल्या प्रवाशांना नवी दिल्लीपर्यंत सुरक्षित व आरामदायक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. रामबन येथे राष्ट्रीय महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे वाहतूक सुलभ झाली आहे.
प्रशासनाने सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी सहकार्य करावे व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.