Skip to content

PEN न्यूज ऑनलाइन टीम :
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील धरणांतील पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच मोठ्या आणि मध्यम धरणांतील साठा 52% वर आला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत केवळ 42% (6.16 लाख दशलक्ष लिटर) पाणी शिल्लक आहे. राज्यातील प्रमुख धरणांतील साठा पुढीलप्रमाणे –
कोयना – 63.64%
गंगापूर – 71.42%
जायकवाडी – 62.17%
राधानगरी – 65.07%
पानशेत – 55.08%
खडकवासला – 70.01%
विभागनिहाय पाणीसाठा – नागपूर (48.83%), पुणे (52.22%), कोकण (57.63%), छत्रपती संभाजीनगर (51.11%).
पुढील काही महिन्यांत पावसाळा सुरू होईपर्यंत नागरिकांना उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.
Related