रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा बायपासवरील RMC (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांटमुळे आजूबाजूच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सिमेंटची धूळ, वायू-ध्वनी प्रदूषण आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे श्वसनाचे विकार, सिलिकोसिस, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार वाढत आहेत, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना त्रास होत आहे.
आरोग्य आणि पर्यावरणीय हानी
प्लांटमधील सिमेंट धूळ (PM10, PM2.5) घरे, झाडे आणि रस्त्यांवर साठते, ज्यामुळे दमा, खोकला, दम लागणे सारखे आजार उद्भवतात. रात्रंदिवस चालणाऱ्या मिक्सर ट्रक आणि यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण वाढले असून, नागरिकांची झोपमोड होत आहे. कांदळवनावर भराव टाकून नष्ट करण्यात येत असल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे; जनतेत केंद्र-राज्य शासनाला जबाबदार धरण्याची चर्चा आहे.वाहतूक आणि सुरक्षितता धोका जड मिक्सर ट्रकांमुळे रस्त्यावर सिमेंट पाणी सांडते, वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. या अनधिकृत प्लांटमुळे कोणाचे आरोग्य खराब होऊन जीव गमावावा लागला तर केंद्रशासन, महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हाधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायतीची जबाबदारी काय, असा संताप जनतेत आहे.
अनधिकृत प्लांटची पायाभूत माहिती अशोका बिल्डकॉन कंपनीला चौल-रेवदंडा बायपाससाठी MSRDCकडून निविदा मिळाली असून, त्यात RMC साठी अक्षया इन्फ्राला काम सोपवले असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्लांटसाठी रायगड जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची लेखी परवानगी नसल्याचे दिसते; अलिबाग परिसरात यापूर्वीही अशा अनधिकृत RMC प्लांट्सवर कारवाई झाली आहे.
कारवाई कधी?
MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) ने MMRमध्ये अनेक RMC प्लांट्स बंद केले असून, नियमबाह्य प्लांट्सवर दंड आकारले आहेत. रेवदंडा प्लांट अनधिकृत चालवून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याने तातडीने चौकशी, बंदी आणि भरपाईची मागणी वाढली आहे. जनतेच्या आरोग्याशी लोकर करणाऱ्या या उद्योगावर शासन कधी कारवाई करणार?
————————-
“कांदळवन नष्ट होतेय, हवा विषारी होतेय. केंद्र-राज्य शासन, MPCB जागे व्हा! शासनाची परवानगी नसेल तर अशा प्लांट्सवर छापा मारून कारवाई करा, अन्यथा जनआंदोलन उभे राहील.”
आशिष पेणकर सामाजिक कार्यकर्ते ————————
चौल रेवदंडात बायपास वरील RMC प्लांटला MPCB व रायगड जिल्हाधिकारी यांची लेखी परवानगी आहे का? असे चौल रेवदंडा मंडळ अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितलं अलिबाग तहसीलदार यांना विचारा मला काही विचारू नका मला काही माहिती नाही.