रायगड जिल्ह्याच्या नव्या पोलिस अधीक्षकपदी आंचल दलाल याची नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे.
आंचल दलाल यांचा जीवनप्रवास हा प्रशासनात झपाट्याने उंचावणाऱ्या, ध्येयवेड्या आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित प्रशासकीय कुटुंबात झाला. वडील दूरसंचार विभागात जीएम पदावर कार्यरत होते, तर मोठे भाऊ शेखर दलाल 2012 साली आयएएस झाले.
गाझियाबादमधील स्थायिक असलेल्या आंचल यांनी शालेय जीवनातच बास्केटबॉल आणि बॅडमिंटनसारख्या क्रीडाप्रकारात आपले कौशल्य दाखवले. विज्ञान शाखेतून पदवी घेतली त्याचबरोबर कायद्याची सुद्धा पदवी घेतल्या नंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि 2018 मध्ये भारतीय पोलीस सेवेतील (IPS) प्रवेश मिळवला.
प्रशासकीय कारकिर्दीत ठळक टप्पे
आंचल दलाल यांची प्रशासकीय कारकीर्द महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्य करत उजळलेली आहे:
सातारा: अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी कायदा-सुव्यवस्थेसाठी कठोर भूमिका घेतली. एका रिसॉर्टवरील डॉक्टरांच्या हायप्रोफाईल पार्टीवर टाकलेल्या छाप्यातून त्यांनी १३ जणांवर कारवाई केली, जी राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
सांगली: गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबवले.
पुणे: राज्य राखीव पोलिस बल, गट क्रमांक १ येथे समादेशक (Commandant) म्हणून जबाबदारी पार पाडली.
रायगड: नुकतीच रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली असून, स्थानिक जनतेमध्ये हा बदल सकारात्मक पावलासारखा घेतला जात आहे.
व्यक्तिगत जीवन
आंचल दलाल यांचा विवाह पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी झाला आहे. एकाच घरात दोन प्रशासकीय अधिकारी असणे हे त्यांच्या कुटुंबातील आदर्श संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतिक आहे.
महिलांसाठी विशेष कार्य
महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सातत्याने प्रभावी उपक्रम राबवले असून, समाजातील दुर्बल घटकांसाठी न्याय मिळावा यासाठी त्यांची कार्यशैली ही संवेदनशील आणि लोकाभिमुख राहिलेली आहे.
उपसंहार
आंचल दलाल यांचा कार्यप्रवास हा केवळ त्यांच्या कुटुंबातील प्रशासकीय परंपरेचा वारसाच नाही, तर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेली प्रेरणादायी वाटचाल आहे. रायगड जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास जनतेमध्ये दिसून येत आहे.