रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या हेदवली व अंबा नदी च्या पाण्यामध्ये मृत मासे पाण्यावरती तरंगत असल्याचे येथिल स्थानिक ग्रामस्थांच्या गुरुवार( दि. १६) रोजी निदर्शनास आले. येवढे मृत मासे होण्याचे नक्की कारण काय, येवढे मासे मृत कशामुळे झाले ? याचे कारण अद्यापही समजले नाही. यामागे एखादा केमिकल घेऊन जाणा-या टॅकंरने त्या ठिकाणी टॅकर धुतल्यामुळे किंवा औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे हे मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हेदवली येथिल नदीवर हेदवली, ऐनघर, कानसई तसेच काही आदिवासी वाड्यांवरील नागरीक या पाण्याचा वापर आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच विविंथ कामांसाठी करत असतात. याआधीच हेदवली गावामध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याची टंचाई असतांनाच या नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत मासे पाण्यावरती तरंगल्यामुळे संपुर्ण पाणी हे प्रदुषित झाले आहे. तसेच याच हेदवली नदीचे पाणी हे वाकण येथिल अंबा नदिला जाऊन मिळत असल्यामुळे हे सर्व मृत मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत अंबा नदीमध्ये आल्यामुळे सर्वत्र मृत माशांचा खच दिसुन आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली .
या प्रदुषित झालेल्या पाण्यामुळे या ठिकाणी असलेल्या वाकण , पाटणसई , बाळसई,गोडसई , वजरोली आदी गावांतील नागरीकांना प्रदुषित झालेल्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नदीवरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना तर अक्षरशः मृत माशांच्या वासामुळे उलटी , डोकेदुखी असे आजार उद्भवले आहेत . तसेच मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे या विभागातील गावांमधिल नागरीकांनपुढे सद्यपरिस्थितीत नदिनदीच्या पाण्याचा वापर करावा की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान यासंबंधीत प्रशासनाने पाण्याचे तसेच मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेऊन नक्की यामागे काय कारण आहे हे शोधुन याबाबतीत योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.