अंबानदी किनारी असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेली उघडी शेड ही रिकाम टेकडे व दारूड्यांचा अड्डा बनली आहे. आशा लोकांचा बदोबस्त करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.
सदरील शेड ही ग्रामपंचायतच्या मालकीची असून ती धार्मिक कार्यक्रम व अंत्यविधीला आलेल्या नागरिकांना वापरण्यासाठी बांधलेली आहे. ती चारही बाजूने उघडी असलेल्या शेडमध्ये बसण्यासाठी बाके व लाईटची व्यवस्था असून या ठिकाणी ही रिकाम टेकडी लोकं दिवसभर तसेच रात्री अपरात्री उशिरा पर्यंत बसलेले असतात. व त्या ठिकाणी दारू पिणे, पत्ते खेळणे, कसेही झोपणे व लहान मोठ्या प्रमाणात वाद विवाद व भानगडी करणे हे त्यांचे नित्याचेच झाले आहे. त्याचा त्रास अंत्यविधीला आलेले नागरिक तसेच तालुक्याचे ठिकाण असलेल्या जाणारे प्रवासी व प्रवाशांना घेऊन जाणार्या पीकअप, मॅजिक,मिनी डोअर गाड्याचा थांबा असून गाडीत बसलेल्या नागरिकांना होत आहे.
हाच प्रकार शेडला लागून असलेल्या पारावर होत असून काही महिन्यांपूर्वी दुपारच्या वेळेत दोन मित्र गप्पा गोष्टी करताना त्यांच्यात वाद होऊन एका निष्पाप मित्राची हत्या झाली असून असा प्रकार पुन्हा होऊ नये तसेच नागरिकांना होणारा त्रास थांबावा यासाठी त्याच प्रमाणे नुकतीच 02 जानेवारी रोजी पहाटे या शेड समोर असलेल्या सरणाची लाकडे ठेवलेल्या ठिकाणी लाकडांना आग लागून हजारो रुपयांचे ग्रामपंचायतचे नुकसान झाले आहे.
सदरील आग ही रिकाम टेकड्या लोकांकडून लागली गेल्याचे नागरिकांकडून बोलले जात असल्याने सदरील ठिकाणी बसलेले रिकाम टेकड्या तसेच दारूड्यांचा बदोबस्त संबंधित खात्याने करण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
—————————————————-
सदरील वास्तु ही गणेशोत्सवात गणेश विसर्जन करण्यासाठी आलेले भाविक तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या नागरीकांना वापरण्यासाठी बांधण्यात आली आहे. सदरील ठिकाणी दारू पिणे,पत्ते खेळणे,वादविवाद करणे यासारखे गैरकृती करताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सौ. सुप्रिया संजय महाडीक,
सरपंच ग्रामपंचायत नागोठणे
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.