पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करुन कोकणातील लाखो चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असुन परतीच्या प्रवासात ही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील माणगाव,इंदापूर ते कोलाड पर्यंतच्या २३ किलोमीटरच्या अंतरावर परतीच्या प्रवासात ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे यामुळे प्रवाशी वर्गाचा खोलंबा निर्माण झाला आहे.
गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावाला आले असुन पाच दिवसाच्या गणपती उत्सवाचे विसर्जन आटपून लाखो चाकरमानी आपापल्या कामावर जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सकाळ पासून मुंबई गोवा महामार्गावर टुव्हीलर,रिक्षा,फोरव्हीलर,एसटी बस,खाजगी बस, मालवाहू ट्रक, प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु झाली आहे यामध्ये माणगाव इंदापूर ते कोलाड येथील बाजारपेठेत १६ वर्षानंतर नंतर ही अजून सिंगल रस्ता असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण होत असुन वाहन काढतांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.यामुळे प्रवाशी वर्गाचा खोलंबा होत आहे.
मुंबई-गोवा हायवे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील रस्त्याचे काम हे अनेक वर्षांपासून रखडला असुन याचा नाहक त्रास प्रवाशी वर्गाला भोगावा लागत आहे. यामुळे पाच ते सहा तासाच्या प्रवासाला १२ ते १५ लागत असले तरी मुंबई गोवा हायवे वरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन जागजागी ठेवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.तर सर्व पोलीस वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करीत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.