मुंबई -गोवा महामार्गाचे काम गेले 14 वर्षापासून सुरू आहे. रायगड आणि रत्नागिरी जोडणार्या घाट रस्त्याला पर्यायी जवळचा मार्ग म्हणून बोगद्याची निर्मीती केली. गेल्या गणेत्शोवासाठी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तो मार्ग खुला करण्यात आला होता परंतु तो आता तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई -गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे प्रवाशांनी आपली वाहने ही घाटमार्गे वळविण्यात यावी असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.