मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे येथे आयोजित वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी 2028-30 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याचा विश्वास व्यक्त केला.
ते म्हणाले की, महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून लॉजिस्टिक धोरण, रस्त्यांचे जाळे, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, विमानतळे आणि बंदरांचे विकास प्रकल्प यावर काम सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने 2014 पासून पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती केली आहे. भारताला 2028 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे असून आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे.
प्रमुख वक्ते टी. व्ही. मोहनदास पै यांनी युवकांसाठी शिक्षण, आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान आणि महिला सबलीकरणावर भर देण्याचे महत्त्व सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.