कर्जत ( गणेश पवार ) :
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भक्ताचीवाडी येथील नळपाणी योजनेची पाण्याची टाकी सन २००५ साली बांधण्यात आली होती. ती टाकी पूर्णपणे जीर्ण जूनी तशी ती धोकादायक बनली असून शेजारील घरांना तसेच लहान मुलांची अंगणवाडी असलेल्या शाळेवर कोसळून दुर्घटना घडू शकते होणारी दुर्घटना टाळण्यासाठी जूनी टाकी पाडून होणारे नुकसान तसेच दुर्घटना टाळावी अशी मागणी ग्रामपंचायती कडे केली जात आहे. दोन वेळा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी पत्र देऊन सुद्धा या टाकी कडे दुर्लक्ष केले जात आहे.असे ग्रामस्थ यांच्या कडून सांगण्यात आले आहे.
भक्ताचीवाडी गावात नळपाणी योजनेची सन २००५ साली पाण्याची टाकी बांधण्यात आली होती.तीचा वापर होत नसल्याने ती खुप जूनी टाकी झाली आहे.पाण्याची टाकी जूनी आणि जीर्ण झाली असल्याने टाकी कधीपण कोसळून टाकी शेजारी असलेल्या घरांवर आणि लहान मुलांची अंगणवाडी शाळेवर कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.जर का टाकी वेळीस पाडली नाही तर शेजारी राहणाऱ्या लोकांच्या व अंगणवाडीत शिकायला येणाऱ्या लहान मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो.
या दुर्घटनेला जबाबदार ग्रामपंचायत आणि प्रशासन असेल असे ग्रामस्थांना कडून सांगण्यात येत आहे. हि दुर्घटना टाळण्यासाठी वेळीस उपाय योजना करून टाकी पाडावी अशी मागणी ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या कडे पत्रव्यवहार करून ग्रामस्थांनी जूनी टाकी पाडण्याची मागणी केली आहे.
———————————————-
भक्ताचीवाडी गावातील जुन्या टाकीची तक्रार ग्रामपंचायत कडे आली आहे.आम्ही पंचायत समिती आणि बांधकाम विभाग यांच्या कडे नविन पत्र बनवून दिले आहे.लवकरच चौकशी करून काय तो निर्णय आमच्या पर्यंत येईल तशी टाकी पाडण्याची कार्यवाही केली जाईल.