Karjat : अखेर दहिवली-मालेगाव पुलाच्या बांधकामाला सुरुवात; पुराच्या पाण्याच्या त्रासापासुन होणार वाहनचालकांची सुटका

Dahivali Bridge
कर्जत (गणेश पवार) : 
उल्हास नदीवरील नेरळ -कळंब या मुख्य रस्त्यावरील दहिवली-मालेगाव येथील मंजूर नविन पुलाच्या कामाचा पावसाळ्यापूर्वी शुभारंभ झाला होता. आता या नविन पुलाच्या बांधकाम कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्या कडून सुरुवात करण्यात आली आहे. या पुलाच्या कामाकरीता तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २२ कोटींचा निधी मंजूर केला होता.
नेरळ -कळंब या मुख्य रस्त्यावर दहिवली -मालेगाव येथील उल्हास नदीवर पुलाचे बांधकाम हे सन. १९७५ च्या काळात करण्यात आले होते. तर साधारण या पुलाच्या बांधकामा साधारण ५० वर्ष पाहाता व सदर पुलाची ऊंची ही कमी पडत असल्याने पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात महापुराची पाणी जात असल्याने, या पुलाचे बांधकाम देखील निकामी झाले होते. व धोका निर्माण झाल्याचे चित्र समोर येत असल्याने, कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दीले होते. 
नेरळ -कळंब या रस्त्यावरू वाहतूक करणाऱ्या नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या समस्यान बाबत काही नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे संर्पक प्रमुख किरण ठाकरे यांच्याशी संर्पक साधुन समस्या मांडल्या होत्या. त्यानुसार किरण ठाकरे यांनी नागरिकांच्या समस्या व या ठिकाणी नविन पुलाच्या बांधकामा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडल्या असता, नविन पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी २५ कोटीचा निधी मंजूर करून दिल्यानुसार होत . त्यानुसार या पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ कोटीच्या अंदाजपत्रकासह मंजुरी देण्यात आल्या प्रमाणे पावसाळ्या पूर्वी मे २०२४ मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
मात्र पावसाळा सुरु झाल्यामुळे या पुलाचे काम हे सहा महिने बंद पडले होते. आता काही दिवसांपासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. तर या नविन पुलाच्या कामाला सुरवात करण्यात आली असल्याने, पुढे या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मात्र जो पूराच्या पाण्याचा त्रास वाहनचालक नागरिकांना होणारा त्रास मात्र भविषात दूर होणार असल्याचे ही वाहनचालक नागरिकांकडून बोलले जात आहे.
————————————-
या पुलाचे बांधकाम हे पुणे येथील ठेकेदार कंपनीला दिले आसुन, त्या ठकेदार कंपनीकडून हे काम वेगाने करण्यात येणार असून मे २०२५ पूर्वी या पुलाचे सर्व १४ पिलर उभे करण्याचा निश्‍चय करण्यात आला आहे.
…संजीव वानखेडे, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading