मीनाक्षी पाटील यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी राजकरणापालिकडे जावून प्रत्येकाशी व्यक्तिगत संबंध जोपसले होते. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेझारी येथे मीनाक्षी पाटील यांच्या निवासस्थानी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीनाक्षी पाटील यांच्या निधनानंतर पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पेझारी येथे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले, अलिबाग मुरुड आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापुर आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार विनय नातू यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राजकारणाच्या पलिकडे जाऊन मीनाक्षी पाटील यांनी सर्वांशी सबंध जोडले होते. आमच्यासोबत त्या आमदार, राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यावेळी प्रत्येकाला प्रेमाने, मायेने, जवळ करून मदत करण्याची त्याची भावना होती. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी आपल्या कामातून दाखवले. मच्छीमारी भूमिपुत्र यानचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला होता. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते होई पर्यंत स्वस्थ बसत नव्हते .अशा व्यक्तिमत्त्वाला महारष्ट्र मुकला आहे. अशी भावना मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त क ली आहे.
मिनाक्षी पाटील ह्या तीन वेळा आमदार म्हणून आमच्या सोबत होत्या.त्यां राज्यमंत्री सुद्धा होत्या. समाजउपयोगीकोणताही प्रश्न हातात घेतला की त्याचा सतत पाठपुरावा करीत तो प्रश्न सुटत नाही तो पर्यंत त्या कधीही स्वस्थ बसल्या नाही.
१९९९ मध्ये स्थापन झालेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी बंदरे आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे राज्यमंत्रीपद काही काळ सांभाळले होते. आपली अभ्यासपूर्ण भाषणे, ओघवती वक्तृत्वशैली यांमुळे त्या उत्तम वक्त्या म्हणून ओळखल्या जात. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनामध्ये कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आयुष्यात ३५ वर्ष ठसा उमटवला अशी यादी केली तर ती मीनाक्षी पाटील यांची आहे. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचारांचा आहे.
पाटील कुटुंबांनी आजही आपली विचारसरणी बदलली नाही आहे. मीनाक्षी पाटील यांचे विधानसभेतील कामकाज लोकांच्या लक्षात राहिले आहे. रायगडच्या विकासाचे प्रश्न त्यांनी गांभीर्याने मांडले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्याचा आत्मविश्वास कमी झाला नव्हता. या काळात दोन वेळा भेट झाली प्रकृती ठीक नसली तरी त्याचे विचार ठीक होते. एक चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे त्यांना महारष्ट्र शासनातर्फे श्रद्धांजली वाहत आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.