अलिबाग/सोगांव (अब्दुल सोगावकर ) :
कीहीम येथे वाडी सांभाळणार्या दाम्पत्यांच्या दोन सख्ख्या मुलांचा दुपारी झोपेतच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार, अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथील दाम्पत्य शीतल सदानंद पोळे, सदानंद नामदेव पोळे हे आपल्या दोन मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत एक वर्षांपासून काम करत आहेत. रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी दुपारी जेवल्यानंतर आराध्या संदानंद पोळे (६ वर्षे) व सार्थक संदानंद पोळे ( ३ वर्षे ) हे झोपले होते, सायंकाळी झोपेतून उठत नाही म्हणून त्यांना उठविण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता दोन्ही भावंड बेशुद्ध अवस्थेत दिसली असता आईने टाहो फोडला.
याबाबतची माहिती सरपंच पिंट्या गायकवाड यांना मिळाली असती त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबतची फिर्याद शीतल सदानंद पोळे (किहीम आदिवासी वाडी, मूळ राहणार – मु. बेलोरा, तालुका – पुसद, जि.यवतमाळ) यांनी मांडवा पोलिस ठाण्यात दिली आहे.
यावेळी जिल्हा रुग्णालयात शीतल सदानंद पोळे व सदानंद नामदेव पोळे यांचे नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.
————————————
आम्ही रात्री उशिरापर्यंत अधिक चौकशी करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात घेऊन जात सोमवार दि. १ एप्रिल रोजी शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात दिले, या मुलांचे अंतिम विधी करण्यासाठी त्यांच्या मूळगावी पुसद- यवतमाळ येथे घेऊन गेले आहेत, याबाबत जे.जे. रुग्णालय यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
…सोमनाथ लांडे, मांडवा पोलिस