३० जानेवारी रोजी सकाळी ११वाजता दोन मिनिटे स्तब्धता पाडून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने एका परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केले आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी राहणार पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३०जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते त्यानुसार यावर्षी ३० जानेवारी २०२५रोजी सकाळी११ वाजता दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा.
या दिवशी सकाळी ठीक१०. ५९ पासून११. ०० वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजवण्यात येईल सदर इशारा भुंगा संपल्यानंतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय /आस्थापना/ शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील अधिकारी/ कर्मचारी/ शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी/ विद्यार्थी तसेच नागरिक इत्यादींनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे सकाळी ठीक११. ०२ मिनिटांनी मौन स्तब्धता संपल्यासंबंधीचा इशारा भोगा सकाळी११. ०३ मिनिटापर्यंत वाजवण्यात येईल.
राज्यात जिथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे सकाळी ठीक११. ०० वाजता मौन( स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते नितेश संबंधितांना देण्यात यावे व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन( स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी अशा आशयाचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सचिन कावळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस महासंचालक व सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.