उरण तालुक्यातील करंजा गावाचा सुपुत्र, ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे, याने ३ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १:०४ वाजता घारापुरी बंदरातून पोहायला सुरुवात करून १८ किमी सागरी अंतर अवघ्या ५ तास २९ मिनिटांत पूर्ण करत करंजा जेट्टीवर पोहोचला.
हा विक्रम करणारा मयंक पहिला जलतरणपटू असून, यापूर्वी त्याने २०२३ साली धरमतर ते करंजा प्रवासात विक्रम नोंदवला होता. त्याच्या या यशस्वी कामगिरीनंतर करंजा जेट्टी येथे ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.
मयंकच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, प्रशिक्षक किशोर पाटील आणि हितेश भोईर यांचे प्रशिक्षण, तसेच विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. त्याच्या या ऐतिहासिक विक्रमामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.