समाजसेवक खरसंबळे यांच्यावर हल्ला निंदनीय, माजी आ. पंडित पाटील यांची कठोर कारवाईची मागणी

Pandit Sheth

अलिबाग ( अमुलकुमार जैन ) : 

समाजसेवक म्हणून काम करणारे खरसांबळे यांच्यावर हल्ला करणे ही बाब निंदनीय आहे. मारेकऱ्यांसह मुख्यसुत्रधार यांना वेळीच पोलिसांनी आवरणे आवश्यक आहे. ही दडपशाही व हूकूमशाही खपवून घेणार नाही. राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे माजी आ. पंडित पाटील म्हणाले.
यावेळी ते म्हणाले, हेमंत खरसांबळे एक चांगला राजकीय, व सामाजिक कार्यकर्ता आहे. समाजसेवक म्हणून देखील त्यांचे काम मोलाचे आहे. तरीदेखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. खरसांबळे यांच्यावरील झालेला हल्ला निंदनीय आहे. त्यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे.
खरसांबळे यांच्यावर यापुर्वीदेखील हल्ला झाला होता. त्यांच्यावरील हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. पोलीस अधीक्षक या घटनेकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरसांबळे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन यातील खरा सुत्रधार कोण आहे, हे शोधून काढावे. अशी मागणी माजी. आ. पंडीत पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading