हजारो कार्यकर्त्यांसह शेकापच्या लाल ब्रिगेडने शक्ती प्रदर्शन करीत शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी १९१ पेण सुधागड विधानसभा मतदार संघात दावेदारी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पेण शहरातील मुख्य मार्गांवरून घोषणा देत झेंडे फडकवत रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रूपांतर महात्मा गांधी वाचनालयाच्या पंटागणामध्ये सभेमध्ये झाले. अतुल म्हात्रे यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन लाटण्याचा शासनाने घाट घातला आहे. आमचा विकासाला विरोध नाही. प्रकल्पांना विरोध नाही. परंतु या विकासात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यात येते. विकास करताना शेतकऱ्यांचाही विकास होणे कर्म प्राप्त आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक युवक विकासक बनला पाहिजे. उद्योजक बनला पाहिजे असे प्रतीपादन अतुल म्हात्रे यांनी केले.
१००० विकासक, १००० बिल्डर्स बनली पाहीजेत
आपल्या भागात अनेक प्रकल्प येत आहेत. त्या ठिकाणी किमान स्थानिकांमधील १००० विकासक, १००० बिल्डर्स आपली मुलं बनली पाहिजेत. तेव्हाच स्थानिकांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होईल. खाजगी विकासक कवडीमोलाने जमीनी घेत आहेत. आपली जमिन गेली की आपली ओळख जाते. जोपर्यंत आम्हाला विकासाच्या प्रभात हात सामील करून घेत नाहीत तोपर्यंत आपली जमीन विकु नका असे आवाहन अतुल म्हात्रे यांनी केले.
यावेळी अतुल म्हात्रे, सुरेश खैरे, महादेव दिवेकर, किसनराव म्हसकर, शिवराम महाबले, अँड रोशन पाटील, निखिल पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र ठाकुर, निलेश म्हात्रे, राजन झेमसे, प्रवीण पाटील यांच्यासह हजारो शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.