सोगांव विभागाला अवकाळी पावसाचा फटका

Zopadi
अलिबाग/सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
सोमवारी आलेल्या अवकाळी पावसाने अलिबाग तालुक्यातील सोगाव विभागातील शेतकऱ्यांचा आंबा, भाजीपाला, वीटभट्टीधारक, बांधकाम व्यावसायिक व इतर सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही मिनिटांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत तर झालेच शिवाय परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
नुकतेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, तो अंदाज काहीसा खरा ठरला, सोमवार दि. १३ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास सोगाव विभागात अचानक वातावरण बदल होत जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले, झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आंबा, भाजीपाला, वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्चा विटांचे, बांधकाम साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याने वीटभट्टी व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी उघड्यावर राहणाऱ्या कामगारांच्या तात्पुरत्या असलेल्या झोपड्यांचे छप्पर उडाल्याने पावसाचे पाणी जाऊन जीवनावश्यक वस्तू भिजून अतोनात नुकसान झाले. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा वादळी वाऱ्याने आंबा गळून पडल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानाबद्दल सरकारने सोगाव विभागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading