नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळ. दि.४ जुन २०२४ रोजी जाहीर झाले. जवळ – जवळ महिनाभरापासून या निकालाच्या प्रतिक्षेत असलेल्या कार्यकर्त्यांचा चेह-यावर सकाळपासूनच उत्साह दिसुन येत होता. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुती आघाडीचे सुनिल तटकरे पहिल्या फेरीपासुनच मतांची आघाडी घेत त्यांनी महाविकास आघाडीचे अंनत गिते यांचा ८२७८४ येवढ्या प्रचंड अशा मतांनी दारुण पराभव करीत राजकारणात असलेले आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले आहे. तटकरेंच्या या विजयामुळे संपुर्ण रायगड जिल्ह्यासह नागोठणे , सुकेळी परिसरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला.
खरंतर ज्यावेळेस रायगड लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी सुनिल तटकरे यांचे नाव जाहिर झाले. त्यावेळीच तटकरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. याचे कारण म्हणजे तटकरेंची सर्व पक्षांशी व सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक ! हीच जवळीक त्यांना जनतेने दिलेली विजयाची पोचपावती आहे. सुनिल तटकरे यांचा विजय हा निश्चितच असल्याची खात्री कार्यकर्त्यांना होती. म्हणुनच नागोठणे विभागातील नेते व कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तटकरेंच्या या विजयामुळे पुन्हा एकदा आपले राजकारणातले असलेले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र महाविकास आघाडीचे अंनत गिते यांचा दारुण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत नाराजी पसरल्याचे चित्र दिसत होते. तटकरेंच्या या विजयामुळे संपुर्ण रायगड जिल्ह्यासह नागोठणे, सुकेळी, वाकण परिसरामध्ये महायुतीच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच पेढे वाटुन मोठ्या उत्साहात तटकरेंचा विजयी जल्लोष साजरा केला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.