पेण तालुक्यात गणेशोत्सव संपल्यावर काही दिवसांतच साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाच्या दिवशी गूळ न वापरता साखर आणि ओल्या खोबऱ्याचे मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते म्हणून या उत्सवाला साखरचौथ गणेशोत्सव असे म्हटले जाते.
पेण तालुक्यातील गणेशमूर्ती जगप्रसिद्ध असल्याने त्यांना मागणी सुद्धा तेवढीच असते. अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत या कारखानदारांना आपल्या घरातील बाप्पाची तयारी करायला वेळ नसतो आणि आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान होऊनही त्याची आदरतिथ्य पूजा अर्चा करायला मिळत नाही याची खंत त्यांच्या मनात असते. मग हा विचार करून गणेशोत्सव झाल्यावर थोडासा विसावा घेऊन पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पेणमध्ये हा साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. दीड ते दोन फुटांपासून ते बारा ते पंधरा फुटांपर्यंत उंच अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती या उत्सवादरम्यान माखरामध्ये विराजमान केल्या जातात.
गुरव आळी आणि दामगुडे आळी येथे सुरू झालेल्या या उत्सवाची लोकप्रियता वाढत चालली आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. साखरचौथ गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत आहे, कारण पेण तालुक्यातील गणेशमूर्त्या जगप्रसिद्ध आहेत आणि येथे ७० टक्के कारखाने आहेत.
उत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रम आणि वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते. यावर्षी, डीजे आणि विविध वाद्यांची मागणी वाढलेली दिसून येते. साखरचौथ गणेशोत्सव पेणमध्ये एक आगळावेगळा अनुभव देतो, जो प्रत्येक वर्षी अधिकाधिक भक्तांना आकर्षित करतो.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.