अलिबाग तालुक्यातील सांबरीमध्ये दहिहंडी उत्सव आनंदात पार पडला. आठवड्याभरापासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने देखिल गोविंदांवर कृपा करत सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साह संचारला होता.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखिल सांबरी गावातील बाळगोपाळांनी दहिहंडीचा मनसोक्त आनंद लुटला राजेंद्र चांगदेव पाटील यांच्या येथे बांधण्यात आलेल्या मानाची हंडी थर लावुन बाळ गोपालांनी फोडली. त्यानंतर गोविंदांनी साखळी धरून ढोल-ताशाच्या गजरात
बोल बजरंग बली की जय
गो…विंदा… रे गोपाळा यशोदेच्या तान्ह्या बाळा | यांच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे… गोपाळा ||
चरल्या गेल्या वनाच्या ठायी | चरता चरता पडला फेच ||
आम्ही पुजू गणोबा देव | गणोबा देवाचे हेलम्बे ||
या गवळणीच्या तालावर ठेका धरत साखळी धरून प्रत्येकाच्या घराजवळून जातांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तसेच स्वत:ची काळजी घेत जवळपास गावातील एकूण १८ दहीहंड्या फोडण्यात आल्या.
सरते शेवटी सांबरीचे ग्राम दैवत श्री धावेश्वर महाराज मंदिरात शेवटची दहिहांडी फोडून सांगता करण्यात आली. या उत्सवासाठी गावातील सर्वांनीच सहभाग नोंदवून खेळी मेळीच्या वातावरणात उत्सवाचा आनंद घेतला.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.