देवरुख ते चिपळूण, मार्लेश्वर ते आंगवली, निवे खुर्द ते कुंडी बेलारी, हरपूडे ते बेलारी या आणि आसपासच्या मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांवरून वाहन चालवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टू-व्हीलर, रिक्षा, फोर-व्हीलर चालकांना सतत कसरत करावी लागत आहे. झाडी देखील वाढलेली असून, ती तोडण्यासाठी कोणी येत नाही. तसेच, खड्डे भरण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंचायत समिती बांधकाम विभाग यांची कोणतीही जबाबदारी घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक आमदार, खासदार, माजी आमदार यांचा आशीर्वाद असल्याने या विभागांना जनतेची काळजी नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना खड्डे भरायचे काम देण्यात आले होते, परंतु त्यांनी काम न करता फक्त पैसे घेतल्याचे आरोप आहेत. देवरुख सह्याद्री नगर ते आरवली, तूरळ, बुरबी, साडवली मार्गावरही प्रचंड खड्डे असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सर्व सुज्ञ नागरिकांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन करून 30 तारखेपूर्वी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.