बोर्लीपंचतन ( मकरंद जाधव ) : प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेले चार दिवस अतिवृष्टी होत असून श्रीवर्धन तालुक्यालासुद्धा पावसाने झोडपून काढलं आहे.मुसळधार पावसामुळे शिस्ते-वडवली आणि कार्ले-दांडगुरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक पाणी ओसरेपर्यंत बंद करण्यात आली.
गेले चार दिवस तालुक्यातील महाविद्यालयांनासुध्दा सुट्टी जाहीर करण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या भातशेतीच्या लावणीलासुद्धा या मुसळधार पावसाचा फटका बसला असून बहुतेक शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाचीसुद्धा चिंता वाढली आहे.श्रीवर्धन बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तुषार लुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली काळसुरी- तुरंबाडी या मार्गावरील खचलेल्या धोकादायक ठिकाणाच्या दुरुस्तीवेळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.प्रसाद ढेबे उपस्थित होते.
कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी भर पावसात आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानुसार तालुका प्रशासन सतर्क असून, तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.