शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या : भाई जयंत पाटील यांचं आवाहन

Jayant Patil
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
वाशी गावातील जगदंबा मंदिरात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी पेण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचाराची सुरुवात केली. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या धनाढ्यांना साथ देणाऱ्या सत्ताधारी नेत्यांवर टीका केली. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या, प्रामाणिक नेतृत्वासाठी मतदारांनी अतुल म्हात्रे यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी आपला विकास स्वतःच ठरवावा. आपली जमीन न विकता प्रकल्पात भागीदारी स्वीकारावी. जमिनीच्या किमती वाढत असून त्यात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अतुल म्हात्रे म्हणाले की, आपल्या विभागात तिसरी मुंबई होऊ घातली आहे. विकासाचा केंद्रबिंदू येथील स्थानिक शेतकरी, भुमिपुत्र असला पाहिजे. विकासाचे धोरण शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही परंतु या विकासात स्थानिक शेतकरी देशोधडीला लागता कामा नये तर तो विकासाच्या प्रवाहात जायला पाहिजे. सिडकोने पड्या भावानी ७५ गावातील शेतकऱ्यांची जमीन घेतली. आज सिडको तिच जमीन 300 कोटी रुपये भावाने विकत आहे. याचा पूर्ण फायदा सिडको प्रशासन व राज्य सरकारला होत आहे, म्हणून शेतकऱ्यांनी जमीन न विकता प्रकल्पात भागीदार व्हायला पाहिजे. तिसरा मुंबईमध्ये किमान 1000 स्थानिक शेतकरी विकासक व्हायला पाहिजेत. विकासकाला दिलेली जमीन पुन्हा रिडव्हलप करताना शेतकऱ्याच्या नावावर व्हायला पाहिजे.
पेण मतदार संघात पर्यावरण पूरक प्रकल्प आले पाहिजेत. एग्रीकल्चर टुरिझम, हॉटेल आणि हॉस्पिटालीटी इंडस्ट्री यासारखे प्रोजेक्ट मधून लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प आमच्या माथी मारून घेणार नाही.  सिडकोच्या प्रकल्पामधून पेण पनवेल परीसरातील बाधित होणारे 88 गाव आम्ही वगळायला लावली आहेत नाहीतर नवी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे शेतकरी विस्थापित झाला तसेच काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली असती. नैना प्रकल्पामध्ये कोट्यावधींचे कर आपल्या शेतकऱ्यांवर लादण्यात आले होते आमचे नेते जयंत पाटील यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांची भूमिका मांडून हा अन्यायकारक कर रद्द करून घेतला.
पनवेल सारख्या ठिकाणी शासनाचा कॉम्पेन्सेशन चा दर ५ ते ६  लाख रुपये गुंठा होता तो वाढून आपण २० ते २६ लाख रुपये करून घेतला, ज्यायोगे बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळेल. गडब परिसरात होऊ घातलेली एमआयडीसीमध्ये शेतकऱ्यांना 82 लाख एकरी दर देण्याचा घट शासनाने घातला आहे हि शुद्ध फसवणूक आहे. परंतु शासनाच्या 2013 च्या कायद्यानुसार मार्केट रेट पेक्षा चौपट असायला पाहिजे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एमआयडीसी लादणाऱ्या शासनाच्या विरोधात भाई जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची संघटना करून चळवळ उभी केली मागील तीन वर्ष ते शेतकऱ्यांकरिता लढा देत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने धनाड्य अशा एस इ झेड सारख्या प्रकल्पाला हद्दपार केला आहे. हि किमया शेकापची आहे.
या वेळी शेकाप नेते सरचिटणीस जयंत पाटील, अतुल म्हात्रे, महादेव दिवेकर, मोहीनी गोरे, महेंद्र ठाकूर, मंगेश पाटील, निलेश म्हात्रे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading