शिहू ( मंजुळा म्हात्रे ) : शिहू बेणसे विभागात विजेचा खेळखंडोबा सुरु असून वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज बिलाच्या वसुलीसाठी इशारा देणाऱ्या महावितरण मंडळाची वीज पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी नाही का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
शिहू बेणसे विभागात आदिवासी वाडया वस्त्यांचा समावेश असून मोठया प्रमाणात लोकवस्ती आहे. अशातच सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे उष्म्यापासून बचाव करण्यासाठी लोक घराबाहेर बसत आहेत अशावेळी सर्प, विंचू व किटकांची भीती असल्याने अंधारात घराबाहेर पडणे नागरिकांना धोक्याचे झाले आहे.
कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभाळीच्या नावाखाली दिवसभर अनेक तास वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असते. वीज देयक वेळेवर न भरल्यास उपस्थित होणारे महावितरनाचे अधिकारी ग्राहकांच्या संपर्काला प्रतिसाद का देत नाही त्यांना ते कमीपणाचे वाटते का ? असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.