सद्यपरिस्थितीत डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत असल्याचे दिसून येत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात ढगाळ तसेच थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा या वातावरणामुळे नागोठणे विभागासह ऐनघर परिसरातील नागरीकांच्या आजारपणात मोठी वाढ झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वातावरणात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली असुन कधी ढगाळ वातावरण तर कधी वातावरणातील वाढलेली उष्णता, यामुळे सारख्या वातावरणातील या बदलांमुळे नागरीकांचे आरोग्य बिघडतांना दिसत आहे. यामध्ये अनेक नागरीकांना ताप , सर्दी, खोकळा, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचा सामना करावा लागत आहे.
या आजारपणामुळे सध्या सर्वत्र दवाखाने फुल्ल झाले आहेत. तरी याबाबतीत कोणालाही ताप, सर्दी , खोकळा अशी काही लक्षणे असल्यास त्वरीत दवाखान्यात जाऊन योग्य ते उपचार घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सुकेळी येथिल जिंदाल रुग्णालयातील डाॅ. मनिष रायकवार यांनी केले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.