लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होत असून वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा पारा आधी 43 ते 45 डिग्री तापमानापर्यंत पोहोचला असल्याने 7 मे रोजी मतदान करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना आपापल्या पक्षाचे मतदान काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र 1989 च्या लोकसभा निवडणुकीत ६६.२ टक्के मतदान झाले होते त्यानंतरच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची टक्केवारी यापेक्षा कमी असल्याने यंदाच्या निवडणुकीत 1989 ची पुनरावृत्ती होणार का असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे.
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यात 32 रायगड, 35 बारामती, 40 उस्मानाबाद, 41 लातूर, 42 सोलापूर, 43 माढा, 44 सांगली, 45 सातारा, 46 रत्नागिरी- सिंधुदुर्ग ,47, कोल्हापूर, 48 हातकणंगले या 11 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक 7 मे रोजी होत आहे.
राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होत असताना या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर वाढत्या तापमानाने आधीच हाहाकार माजविला आहे. त्यातच पाणीटंचाई ही तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने मतदार वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईमुळे बेजार झाला आहे राज्यात उष्णतेचा पारा 43 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणावर सर्वत्र जाणवत आहे त्यामुळे सकाळी नऊच्या आधीच सर्वसामान्य नागरिक आपली कामे उरकून घरातच बसतात त्यातच सात मे रोजी मतदान असल्याने व एप्रिल महिन्यापेक्षा मे महिना हा उष्णतेचा तीव्रता अधिक असणारा महिना असल्याने या काळात उष्णतेची तीव्रता किती मोठी जाणवते यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून आहे. मतदाराची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वच पक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्यांबरोबरच शीतपेय व आईस्क्रीम यासोबत वातानुकूलित गाडीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच पक्ष या दृष्टीने तयारीला लागले आहेत.
32 रायगड लोकसभा मतदारसंघात सन 1977 स** 61.68%, तर 1980 स* 63.5% ,तर 1984 स* 64.43% सन 1989 स* 66.2% ,1991 स* 51.93%, सन 1996 स* 57.68%, सन 1998 स* 57.79%., सन 2004 स* 61.32%, सन २००९ स* 56.27%, सन 2014 स* 64.47%, तर 2019 च्या निवडणुकीत 61.81% एवढे एवढ्या मतदानाची टक्केवारी झाली होती मात्र आतापर्यंतच्या मतदान टक्केवारीच्या आढावानुसार सन 1989 स* झालेली मतदानाची 66.2% एवढी टक्केवारी पाहता या टक्केवारीचा अद्याप पर्यंत विक्रम मोडलेला नसल्याने सन 1989 ची पुनरावृत्ती 2004 स** होणार का असा सवाल सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे त्यातच उष्णतेची तीव्रता लक्षात घेता साधारणपणे 62% च्या वर मतदान जाणार नाही असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.