लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानकृत ‘शेतकऱ्यांचा राजा’ रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीनंतर विसर्जित

poladpur-ganesh
पोलादपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केल्यानंतर त्यांना रोजगाराची रक्कम देण्याबाबत विलंब होत असून बेरोजगार भत्ता देण्यासंदर्भातही चालढकल होत असल्याने लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांनी आत्मदहनाचा इशारा कारण कोर्टात जाण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नव्हती. पोलादपूरकर शेतकऱ्यांसाठी रोजगार व बेरोजगार भत्ता देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्यास रोहयो हा कायदा असल्याने कोर्टात जनहितार्थ याचिका दाखल करण्याची भूमिका आम्ही पोलादपूरकर नक्कीच घेऊ, असा प्रेमाचा दम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर यांनी दिला.
लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानकृत ‘शेतकऱ्यांचा राजा’ गणेशोत्सवाच्या अनंतचतुर्दशीच्या दिवशी रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असता याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून शैलेश पालकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर सहायक गटविकास अधिकारी हंबीर, पोलादपूर भाजपा तालुकाअध्यक्ष प्रसन्ना पालांडे, पोलादपूर शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, विस्तारअधिकारी विकास शिंदे, एचडीएफसी बँकेचे मॅनेजर निलेश आंबेतकर, हिंदी पत्रकार किसन सिंह व प्रिती बुटाला, मंदार गोळे, संजय चोरगे, राजेश डांगे, दिनकर कोंडाळकर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रोजगार हमी योजनेची आढावा बैठक लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास नलावडे व सचिव योगेश भोसले यांनी 10 गावांतील सुमारे 150 शेतकऱ्यांना निमंत्रित करून ‘शेतकऱ्यांचा राजा’ गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त चर्चासत्र आयोजित केले. यावेळी स्वदेसचे येवले, प्रसन्ना पालांडे, एचडीएफसीचे मॅनेजर निलेश आंबेतकर, अनिल मालुसरे, एबीडीओ हंबीर, मंदार गोळे यांनी विचार मांडले.
याप्रसंगी लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांनी, आपण गावाकडे आलो आहोत ते रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका मांडली. यावेळी रोजगार हमी योजनेचेच नव्हे तर सहकाराचे व जनतेच्या अन्य वैयक्तिक विकासाचे काम  हाती घेणार असल्याने अधिकाऱ्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी मोरसडे येथील तुकाराम उतेकर व सखाराम शिंदे, दिविल येथील विनोद थिटे व सविता जगताप, बोरघर येथील नामदेव गोगावले व सडवली येथील अनिल नांदे तसेच प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी जाधव आदी नावाजलेले शेतकरी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रकांत चिकणे यांनी केले तर व्यवस्थापन चंद्रकांत बेलोसे यांनी केले. यावेळी ‘शेतकऱ्यांचा राजा’ गणेशोत्सवाची महाआरती सहायक गटविकास अधिकारी हंबीर यांच्यासह शेतकऱ्यांच्याहस्ते करण्यात येऊन महाप्रसादानंतर श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन श्रीदेवी गंगामाता घाटावर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading