आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघातील संसदरत्न महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीच्या वतीने संजोग वाघेरे यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली होती. यामध्ये बारणे यांना मताधिक्य मिळाले असले तरी त्यांच्या विजयामध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे महायुतीमधील घटक पक्षांनी ज्याप्रमाणे कामे करणे आवश्यक होते ते झाले नाही.
बारणे यांनी निकाला पूर्वीच स्पष्ट केले होते की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मते मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यातच माथेरानमध्ये जरी कमी मतदान असले तरी सुद्धा येथील महायुतीची ताकद पाहता महाआघाडी पेक्षाही जवळपास ९३ मते कमी मिळाली आहेत.
एकूण मतदान २२५९ इतके झाले होते त्यातील बारणे यांना फक्त १०८३ मते तर आघाडीच्या वाघेरे यांना ११७६ मते मिळाली आहेत. निवडणूक निधी सुध्दा चांगल्या प्रकारे दिलेला असताना देखील बारणे यांना मते मिळाली नाहीत. निधीचा उपयोग सुयोग्यपद्धतीने करण्यात आला नसून जे पक्षात अधिकृत सुध्दा नाहीत आणि काही ठिकाणी मद्यपीच्या हातात काही प्रमाणात निधी सुपूर्द करण्यात आला होता असेही बोलले जात आहे.
घटक पक्षांना सुध्दा विचारात घेतले गेले नाही तसेच महायुती मधील काहीजणांच्या नातेवाईकांचे हितसंबंध महाआघाडीच्या नेत्यांबरोबर आजही असल्याने त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्याचेही बोलले जात आहे.
मागील पतसंस्था निवडणूक काळात सुध्दा हीच परिस्थिती होती. युतीत राहून गद्दारी करण्याची सवय येथील काही अल्प मतदान असणाऱ्या पक्षात आहे त्यामुळे आगामी काळात नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोबत राहून धोका देणाऱ्या पक्षांना सोबत न घेतलेले बरे अन्यथा नातीगोती सांभाळण्यात काही मंडळींकडुन सत्ता हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी गावात चर्चा रंगली आहे
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.