महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत असली तरी योजनेबाबत पसरवले जाणारे गैरसमज दूर करण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या किंवा लाभधारक महिलांचे पैसे परत घेतले जात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर तटकरे यांनी स्पष्ट केले की, “आत्तापर्यंत एकाही लाभार्थिनीचे पैसे परत घेतलेले नाहीत. आम्हाला पात्र महिलांचाच लाभ सुरू ठेवायचा आहे, परंतु काही महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत. या प्रक्रियेचा कोणत्याही महिलेला गैरसोय होणार नाही.”
तटकरे यांनी सांगितले की, योजनेतील काही अर्ज अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसह आले आहेत. तसेच काही महिलांनी विवाहानंतर अन्य राज्यात स्थलांतर केले आहे, ज्यामुळे त्या स्वतः लाभ बंद करण्यासाठी अर्ज करत आहेत.
सद्यस्थितीत सरकारकडे दररोज 5-10 हजार अर्ज येत असून, वर्षभरात पडताळणी प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू राहील. मंत्री तटकरे यांनी आश्वासन दिले की, “कुठल्याही महिलेला तिच्या इच्छेविना लाभ बंद करण्यात येणार नाही.”
यामुळे लाभार्थिनींनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.