रोहा तालुक्यात वणव्याचा तांडव; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

रोहा तालुक्यात वणव्याचा तांडव; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील गोवे येथे अचानक लागलेल्या वणव्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजू, चिकू, फणस यांची झाडे आगीत जळून खाक झाली. यामुळे कैऱ्या गळून पडल्याने आणि झाडांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
बुधवार, ५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात त्याने रौद्ररूप धारण केले. नंदा शिवराम वाफिळकर यांचे १०-१२ आंबा व काजूची झाडे, निलेश चंद्रकांत वाफिळकर यांची १२ आंबा-काजूची झाडे, तसेच एकूण २५-३० फळझाडे जळून गेली. या आगीत बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे.
शेतकरी अनेक वर्षे मेहनत करून ही झाडे वाढवतात, मात्र काही क्षणात वणवा त्यांच्या कष्टांवर पाणी फिरवतो. एका वर्षात घर बांधता येते, पण नष्ट झालेल्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी दहा-बारा वर्षे लागतात. प्रशासनाने त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading