रोहा तालुक्यात उष्णतेचा कहर, कोलाड खांब परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण!

Mseb2
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत असताना विद्युत महामंडळाकडून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे उष्मलाटेत त्रस्त होत आहेत. कोलाड खांब परिसरात मागील काही दिवसांपासून विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. तसेच विद्युत महामंडळाच्या मनमानी कारभारावर मोठी संतापाची लाट उसळली आहे.  दिवसातून तीनचार वेळा वीज खंडित होत आहे तर आठवड्यातून तीन ते चार दिवस ग्राहक वर्गाला कोणतीही सुचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आधीच उष्णतेची लाट गर्मीने अंगाची लाही लाही शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँका, झेरॉक्स सेंटर, ई सेवा केंद्र,तसेच घरगुती ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोलाड परिसरातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठ्यातील या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी कामांमध्येही अडथळे निर्माण होत असल्याचा संताप नागरिकांकडून होत आहे तसेच वेळेवर वीजबिल भरण्यासाठी दबाव टाकणारे अधिकारी, वीज पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप स्थानिक ग्राहक मंडळींकडून व्यक्त केला जात आहे.
रोहा तालुक्यात सध्या अघोषित भारनियमन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समजले जात आहे. नागरिकांनी विचारणा केली आहे की, ‘कुठेही भारनियमन नसताना रोहा तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा का खंडित होतो?’ यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे, तसेच संभाव्य असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास नागरिकांचा संताप अधिक वाढू शकतो. सामान्य नागरिक महावितरणच्या गलथान कारभाराला वैतागला असून व्यवस्थापनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
——————————————
विज ग्राहक वेळेवर वीज बिल भरतो, न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जातो तसेच आम्हाला योग्य दर्जाचा वीज पुरवठा अथवा त्याची सेवा मिळत नाही. दिवस-रात्र होणाऱ्या वीज खंडितीमुळे ऑनलाईन कामांमध्ये अडथळे येत आहेत. आता महावितरणने या समस्यांवर लक्ष देण्याची वेळ आली आहे.
..डॉ मंगेश सानप, अध्यक्ष कोलाड लायन्स क्लब.
——————————————
कोलाड खांब परिसरातच नव्हे तर रोहा तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने वेळेत या समस्यांकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, तसेच वीज पुरवठा खंडित करण्याआधी ग्राहकांना वेळीच सूचना करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन उभे करावे लागेल.
…दिनेशकर सानप, युवा भाजप कार्यकर्ते पुई कोलाड विभाग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading