बेरोजगार युवकांना रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून खोटे दस्तऐवज बनवून पेण तालुक्यातील दोन युवकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्यां विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेण तालुक्यातील काश्मिरे येथे राहणारे अमृत हिरु पाटील वय ६० वर्षे हे शेतमजुर आहेत. त्यांना सूरज व सागर नावाची दोन मुले आहेत. या दोघांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच रेल्वे विभागाचे खोटे बनावट दस्तऐवज तयार करुन सूरज व सागर कडून ५ लाख ४० हजार रूपये रक्कम घेऊन लाखों रुपयांची फसवणूक केली आहे.
रेल्वेचे दस्तऐवज खोटे असल्याचे लक्षात आल्यानंतर सागर व सुरज याने दिलेले पैसे परत करण्याचा तगादा लावला असता या प्रकरणातील एक एजेंट पाटील राहणार डोलवी याने सागर पाटील च्या गुगल पे आकाऊंटवर १ लाख ५० हजार परत केले. परंतु उर्वरीत रक्कम रुपये ३ लाख ९० हजार रुपये परत न केल्याने अखेर या दोन्ही तरुणांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात वडखळ आणि अलिबाग येथील महिलांचा मुख्य हात असल्याने त्यांच्या विरोधात ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहा,फौजदार सोनावळे करत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.