रुरल कम्युन्स,नारंगी येथे नाबार्डचे अधिकारी (DDM) व दरडग्रस्त स्थलांतरीत ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण

vruksharopan
खालापूर : रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सतत अतिवृष्टी होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तसेच नद्यांनीही धोक्याची पातळी ओलाडली होती. हवामान खात्याकडून रायगड जिल्हयाला रेड अलर्ट सांगितल्याने ग्रुप ग्रामपंचायत नारंगी हद्दीतील दरडग्रस्त आदिवासी दत्तवाडीतील एकूण १२० लोकांना अनुभविक प्रशिक्षण केंद्र – रुरल कम्युन्स नारंगी संस्थेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
या सर्व लोकांना रुरल कम्युन्स संस्थेमध्ये निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. या लोकांना पंचायत समितीचे शासकीय अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत, नारंगीचे कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र,वावोशीचे कर्मचारी वर्ग नियमितपणे भेटी होत असतात.
त्याचप्रमाणे दि. ३१ जुलै २०२३ रोजी नाबार्डचे रायगड जिल्हा विकास प्रबंधक) प्रदीप अपसुंदे सर यांनी रुरल कम्युन्स संस्थेचे मुल्यांकन करण्यास आले असता त्यांच्या हस्ते व ग्रुप ग्रामपंचायत.नारंगीचे ग्रामसेवक  गणेश श्रीधर मोरे व स्थलांतरीत आदिवाशी लोक यांच्या उपस्थितीत संस्थेच्या आवारात आंबा.चिकू,पेरू इत्यादी फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमामध्ये संस्थेचे कर्मचारी  बी.सी.पाटील, वामन वाघ, मंदार पाटील, मार्शल पाटील, वंदना पाटील, निधी पाटील, दर्शना मते यांचा देखील सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading