रायगड जिल्ह्यात 52 किलो अंमली पदार्थांची नाश करण्याची कारवाई; लाखो रुपये किंमतीचा गांजा व चरस नष्ट

Raigad Drugs Nashta
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील कर्जत, नागोठणे, नेरळ, पोयनाड, मांडवा सागरी, रेवदंडा, महाड, वडखळ, गोरेगाव, रसायनी, मुरुड आणि खोपोली या १२ पोलीस ठाण्यांमध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या १५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आले.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी, एकूण ५२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ, त्यामध्ये ५० किलो ९९२ ग्रॅम गांजा आणि १ किलो ४७ ग्रॅम चरस, ज्याची एकूण किंमत ₹८,४८,३१८/- (आठ लाख, अठ्ठेचाळीस हजार, अठरा रुपये) इतकी आहे, तो मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड (MWML), तळोजा, नवी मुंबई येथे योग्य कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नष्ट करण्यात आला.
ही कार्यवाही एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ५२ अ (२) नुसार करण्यात आली असून, यावेळी खालील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती:
  • सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग
  • अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग
  • परशुराम कांबळे, पोलीस निरीक्षक (अति. कार्यभार पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, रायगड-अलिबाग)
  • बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग
तसेच यावेळी अ. स. गावकर, सहायक रासायनिक विश्लेषक (न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा, कलीना, मुंबई), डॉ. गजानन खडकीकर, क्षेत्र अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड), सुरेश देवकाते, निरीक्षक (वैद्यमापन शास्त्र, अलिबाग विभाग रायगड) आणि दोन शासकीय पंच यांची उपस्थिती होती.
पोलीस प्रशासनाने केलेली ही कारवाई अंमली पदार्थविरोधातील धोरणबद्ध प्रयत्नांचे उदाहरण असून, यामुळे जिल्ह्यातील समाजातील सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading