रायगड जिल्ह्यात “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू” अभियानाची सुरूवात १ मे पासून

Compost khadda
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यात १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू” हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.
या अभियानाअंतर्गत गट विकास अधिकारी पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कार्यशाळा आणि बैठक घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थांना माहिती देतील आणि गावात दवंडी दिली जाईल. शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयात सूचना फलकावर माहिती प्रसारित केली जाईल.
१ मे ते १० मे दरम्यान संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरला जाईल, त्यापासून खत तयार करून १५ सप्टेंबरपर्यंत खत उपसण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
कंपोस्ट खड्ड्यांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ, महिला बचत गट आणि युवक मंडळांचा सहभाग घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading