रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नक्की कोण विराजमान होणार याकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष

Aditi & Gogavale
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सत्तासंघर्ष दरी ही दिवसेदिवस वाढत जात असल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोण विराजमान होणार याकडे रायगड जिल्ह्यातील नागरिकांसहित महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे.
रायगड जिल्ह्याला विद्यमान महायुतीच्या सत्ताधारी काळात दोन कॅबिनेट मंत्री पदाची माळ ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बाल विकास विभागाचे मंत्री तर शिवसेने शिंदे गटाचे उपनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीत असणारे महाडचे आमदार भरत गोगावले यांना रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभागाचे मंत्री म्हणून या दोघांच्या गळ्यात पडली आहे.
दोघांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील आमदार महेंद्र दळवी व आमदार महेंद्र थोरवे यांच्यासहित जिल्ह्यातील शिंदे कार्यकर्त्यानी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मागील सत्ताकाळात विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे असल्याने हे पद रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बाल विकास मंत्री या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी असल्याने त्यांना रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती माहिती असल्याने त्यांच्याकडे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून होत होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 जानेवारी 2025 रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली असता त्या यादीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जाहीर झाल्यानंतर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासहित शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्यासहित जिल्ह्यात नाराजीचा सूर पसरून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी मूंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील महाड एम आय डी सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर जाळपोळ करीत सुमारे दोन तास चक्क जाम केले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार कार्यकर्ते यांच्याकडून जिल्ह्यात होणारा उदेक पाहता तात्पुरता पालकमंत्री पदास्थगिती दिली होती मात्र जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण हा अदिती तटकरे यांच्याहस्ते करण्यात आले.
शिवसेनेचे आमदार तथा मंत्री भरत गोगावले यांनी विरोध दर्शवला. गोगावले समर्थकांनी रास्ता रोकोही केला. रायगडमधील पालकमंत्रिपदावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामा देतो, असं वक्तव्य केले. भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंना खुले आव्हान देत मोठं विधान केले. आमची एक तरी चूक दाखवून द्या, असे थेट चॅलेंज गोगावलेंनी तटकरेंना केलेय.
रायगडचं पालकमंत्रिपद आणि महायुतीत गद्दारी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आव्हान प्रतिआव्हानाची भाषा सुरू असताना मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना आता थेट आव्हान केलंय. लोकसभा निवडणुकीत जर काही चुकीचं वागलो असेन तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो. असं भरत गोगावले सुनील तटकरे यांना आव्हान देत म्हटलेय. आमची एकतरी चूक त्यानी दाखवून द्यावी, असेही गोगावले म्हणालेत.
ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आव्हान देतोय, खासदारकीच्या वेळी आमच्याकडून एक जरी चूक झालेली असेल, ती दाखवा. लाडक्या बहि‍णींच्या समोर सांगतो, मंत्रि‍पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा नाही दिला तर दोन बापाचा. हे माझं चॅलेंज. ते माझं चुकलं म्हणतात, त्यांनी एकतरी चूक दाखवून द्यावी.

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर शिवसेनेचा नेता असावा, असे मत व्यक्त केले. तटकरे आणि गोगावले यांच्यातील संघर्ष आधीपासूनचाच आहे. मागील सरकारमध्येही गोगावले यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद हवे होते, पण त्यावेळी त्यांना हुलकावणी मिळाली होती. आता त्यांना मंत्रिपद मिळाले, पण पालकमंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते पुन्हा नाराज आहे.

रायगडमधील पालकमंत्रिपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होणार आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर कोणाची नेमणूक होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यावरून महायुती सरकारमधील राजकीय समीकरणे ठरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading