संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील नागोठणे, सुकेळी, वाकण परिसरामध्ये उत्तर भारतीयांची छटपुजा उत्साहात साजरी करण्यात आली. सुकेळी येथिल जिंदाल कंपनीच्या मागे असलेल्या नदिवर तर वाकण, नागोठणे येथिल उत्तर भारतीयांनी अंबा नदीच्या किनारी जाऊन गंगापुजन करुन छटपुजा साजरी केली.
उत्तर भारतीयांचा सर्वांत मोठा सण मानला जातो तो म्हणजे छटपूजा. यांच्यामध्ये छटपुजेला भरपुर महत्व दिले जाते. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंडमध्ये मुळनिवासी असलेले अनेक परप्रांतीय नोकरी धंद्याच्या निमित्ताने येथे येऊन स्थायिक झाले आहेत. गुरू. दि.७ नोव्हेंबर रोजी सुर्यास्ताच्या वेळी विभागातील अंबा नदीच्या किनारी महिला, पुरुष, लहान मुले मुली एकत्र जाऊन जल्लोषात छटपुजा साजरी केली. यावेळी नटुन थटुन असलेल्या महिलांनी कपाळी कुंकू व भागांमध्ये सिंदुर भरुन डोक्यावर पदर , हाती छटपुजेचे साहित्य भरलेले सुपले घेऊन नदिच्या पात्रात उतरुन पाण्यात उभे राहुन सुर्यदेवतेला अर्ध्य देत मनोभावे उपासना केली.
छटपुजेचे कठीण व्रत करणारे भाविक सुर्य देवतेला अर्ध्य देऊन या दिवशी ३६ तासांचा उपवास करतात. यामुळे भाविकांच्या मनोकामना पुर्ण होतात. संतान प्राप्ती, सुखसमृद्धीसाठी ही पुजा केली जाते अशी या लोकांची भावना आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.