रायगडचा खासदार कोण ! मतमोजणीला काही तास शिल्लक, कोण जिंकणार कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

Sunil Tatkare & Anant Geete
कोलाड ( श्याम लोखंडे ) :
रायगडचा गड कोण जिंकणार ? विकासाचे शिलेदार महायुती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे की महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे निष्कलंक उमेदवार अनंत गीते या उमेदवारांत मोठी कांटे की टक्कर असल्याचे बोलले जात आहे मात्र निवडणुक कोण जिंकणार रायगडकरांसह संपुर्ण महाराष्ट्राचे डोळे या निकालाकडे लागले असून कार्यकर्त्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रायगडाचा राजधानीत कोनाची विजयाची मशाल पेटणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान 7 मे रोजी झाले असून त्याचा निकाल अथवा मत मोजणी मंगळवारी 4 जून रोजी होत आहे.त्यामुळे रागडच्या राजधानीवर मोठी संघर्षाची आणि अस्मितेची समजली जाणारी ही लोकसभेची निवडणूक कोण जिंकणार याचीच चर्चा सुरू झाली आहे पण मतदानाचा टक्का घसरला आहे त्यामुळे उमेदवारांची विजयाची धाकधूक वाढली आहे तर निवडणुकीत कोण जिंकणार कोण गुलालाची उधळण करणार तसेच प्रचार दरम्यान केलेले एकमेकांविरोधातील दावे प्रती दावे कोणाला यशस्वी ठरतात याकडेच रायगड सह उभ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.निवडणुकीत महायुतीचे खा. सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते आमनेसामने आल्याने निवडणुक मोठी चुरशीची ठरली आहे. तर मतमोजनी आज आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून विजयाचे शिलेदार कोण तटकरे की गीते? याच चर्चेला आज अखेर शिक्काोर्तब होणार आहे.
रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि 4 जून रोजी स. 8 वा. अलिबाग, नेहूली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीस सुरुवात होणार आहे.32 रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मतदानाची टक्केवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे 2024 रोजी एकूण 2 हजार 185 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये एकूण 60.51 टक्के एवढे मतदान झाले.पेण 64.51टक्के, अलिबाग 66.67%, श्रीवर्धन 59.20%,महाड 57.56%, दापोली 57.37%, गुहागर  56.44% तसेच अलिबाग नेहूली येथील क्रीडा संकुलात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी पार पडणार आहे. याठिकाणी सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी 8 वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होनार आहे .
मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत.
 191 पेण विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 27फेऱ्या होणार आहेत.
 192 अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील.
 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी 26 फेऱ्या होणार आहेत.
 194 महाड विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल लावण्यात येणार असून 29 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.
 263 दापोली विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 27 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.
 तर 264 गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 14 मतमोजणी टेबल लावण्यात येणार असून 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.
टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी टेबल लावण्यात आलेले आहेत.
मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती
मतमोजणीसाठी एकूण 1 हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.
मोबाईल नेण्यास मनाई
मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई, निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधीना क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल.
100 मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
निकाला आधीच कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकावले
मतमोजणीला काही तासच शिल्लक राहिले आहेत तर मोजणी नंतर उमेदवारांच्या विजयाची घोषणा करण्यासाठीं देखिल काही तासच उरले असताना दोन्हीं उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी विजयची बॅनर बाजी निकाला आधीच केल्याने मतदारांचा गुपित कौल कोणाला हे माञ मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. मात्र विजयी उमेदवार कोण यावर मोठा पेच रायगडात दोन्ही उमेदवार विजयाच्या तयारीत आहेत. त्यावेळीच खरी गंमत शिवसैनिकांचीच होणार आहे. कारण शिवसेनेच्या विभाजनानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणुक असल्याने शिवसैनिकांनी कोणती बाजू उचलून धरली हे स्पष्ट होणार आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते या दोघांमध्ये चढाओढ निर्माण करणारी अशी निवडणुक पार पडली. त्यामध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांचा विजय होईल, असे एक्झिट पोलने अंदाज वर्तविल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र राष्ट्रवादी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या विजयाची खात्री जाहीर केली आहे.
रायगडमध्ये शिवसैनिक इतके आश्वासकपणे गिते यांच्या विजयाचा विश्वास जाहीर करत असतील तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही शिवसैनिकांचा तितकाच आश्वासकपणा असणार असे म्हटले जात आहे. आता घोडेमैदान जवळ आहे. फक्त तास देशाचा निवडणुक निकाल जाहीर होण्यास उरले आहेत. प्रत्यक्षात आता काही तासावरच मतदान निर्णय प्रक्रिया सुरू होणार आहे. तर विजयाची बॅनर बाजी सूरू झाली असली तरी कोकणातील विशेषतः रायगड मतदारसंघात विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये धाकधुक वाढली आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार असे दोन्ही बाजूंनी म्हटले जात आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार सुनील तटकरे, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात जोरदार लढत झाली. एकास एक लढतीचे चित्र बदलून नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या.देशातील, राज्यातील दिग्गज नेत्यांनी सभा, पदयात्रा घेतल्याने येथे प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता. याहीवेळी पूर्वापार प्रतिस्पर्धी महायुतीचे खा. सुनील तटकरे आणि इंडिया आघाडीचे अनंत गीते यांच्यात तिसऱ्यांदा लढत झाली आहे.
दोनही पक्षांचे नेते-कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येईल असा दावा करीत आहेत. त्यामुळे कोणाचा दावा खरा ठरतोय? हे पहाण्यासाठी उद्या 4 जूनच्या मतमोजणीत कडे डोळे लागले होते. मात्र तो दिवस आज उजाडला असून कोण निवडून येणार आहे . यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची उत्सुकता ही शिगेला पोहोचली असून रायगडच्या राजधानीत घड्याळ की मशाल कोण विजयाची मशाल पेटवनार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर निकलाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकावले आहेत त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्ते आणि काहींची तर अक्षरशः धाकधूक वाढली असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading