राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचं बिगुल वाजलं

Vidhan Parishan Voting
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
विधानसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांतच महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या या जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे.
का होत आहे ही निवडणूक?
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला, आणि त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम:
१० मार्च – अधिसूचना प्रसिद्ध
१७ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
१८ मार्च – उमेदवारी अर्ज छाननी
२० मार्च – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
२७ मार्च – सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान
२७ मार्च (संध्याकाळी ५ वाजता) – मतमोजणी आणि निकाल जाहीर
महायुतीपुढे आव्हान
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या एकतर्फी विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, विधान परिषदेच्या या निवडणुकीतही सर्वच्या सर्व पाच जागा जिंकून आपला दबदबा कायम ठेवण्याचे आव्हान महायुतीसमोर असेल. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading