महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय सुकाणू समितीने मान्य केला आहे. येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.
कसा असेल अभ्यासक्रम?
राज्यातील शाळांमध्ये 70% सीबीएसई आणि 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असेल. भाषा आणि इतिहास विषयांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास हा राज्य शिक्षण मंडळाच्या 30% अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी काय तयारी?
यावर्षी इयत्ता पहिलीत हा अभ्यासक्रम लागू केला जाणार असून, त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्ता समाविष्ट केली जाईल. पाठ्यपुस्तकांची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असेल, तर 1 जूनपासून शाळा सुरू होताच शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही इतिहास विषयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी हा नवा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.