रत्नागिरीत मोठा राजकीय भूकंप ! भाजप नेत्यांचे शिवसेनेत प्रवेशाचे संकेत, उदय सामंत यांच्यासमोर मोठे आव्हान

Udhav Thakare & Uday Samant

संगमेश्वर  :

रत्नागिरीतील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी, भाजपचा एक बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या समर्थकांसह माजी खासदारांनाही सोबत घेतले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, रत्नागिरीतील काही भाजप नेते आणि त्यांच्या समर्थकांचा लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यमान आमदार उदय सामंत यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
उदय सामंत यांच्यावर गद्दारीचा आरोप केला जात आहे, ज्यामुळे त्यांच्या विरोधात रत्नागिरीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना त्यांच्या “अवकातीत” दाखवण्याचा शिवसेनेचा मानस आहे.
शिवसेना उपनेत्यांनी सांगितले की, हा निर्णय रत्नागिरीतील सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेऊनच होईल. येत्या दोन दिवसांत रत्नागिरीत राजकीय घडामोडींमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading