दिल्लीसह आगामी काळात महाराष्ट्रात होणार्या महानगरपालिका व इतर सर्व निवडणुका निश्चितपणे महायुतीच जिंकेल असा ठाम विश्वास आज पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश बारसिंगे, सुमित बोरे, आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पनवेल महानगर जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, तालुकाध्यक्ष विजय पवार, प्रमोद महाडिक, मोहनिश गायकवाड, सुशांत सकपाळ, अविनाश कांबळे, दादु निकम, प्रभू जाधव, दिनेश जाधव, राहुल सोनावणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री ना.रामदास आठवले यांनी सांगितले की, पक्ष बांधणीचे काम सुरू असून पक्षामध्ये आता सर्वसमाजातील घटकांना एकत्रित करून पक्ष बांधणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या दौर्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुका एकत्रितपणे लढविल्या जातील. तसेच दिल्ली येथे आम्ही 20 उमेदवार उभे केले असून 50 ठिकाणी भाजपला पाठींबा दिला आहे व दिल्लीमध्ये सुद्धा भाजपचे सरकार येईल. कारण केजरीवाल यांनी केलेला भ्रष्टाचार हा आता लोकांना माहित पडल्याने दिल्लीतील जनता ही भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील.
रायगड जिल्ह्यात लोकनेते रामशेठ ठाकूर, खा.धैर्यशिल पाटील, आ.प्रशांत ठाकूर व महायुतीचे सर्व आमदार येथे चांगले काम करत असून विरोधक आता संपत चालला आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सुद्धा पक्ष बांधणी जोरदारपणे केली आहे व प्रत्येक ठिकाणी होणार्या अन्यायाविरुद्ध ते आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून आवाज उठवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देत आहेत. विकासाच्या दृष्टीने आगामी होणारे विमानतळ या ठिकाणी नोकर भरतीसाठी स्थानिकांचा प्रामुख्याने विचार करावा, तसेच दलित बांधवांना सुद्धा 25% जागा येथे ठेवावी यासाठी अदानी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्या झोपड्यांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी एस.आर.ए. सारखी सरकारने पनवेलमध्ये राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 लोकांना महायुतीच्या सरकारने मोक्का लावला आहे. तशाच प्रकारे वाल्मिक कराड याला सुद्धा मोक्का लावावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमचा बांधव सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यू प्रकरणी निपक्ष पातळीवर चौकशी व्हावी व त्याला न्याय मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.