महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळ नरसोबाची वाडी हे दत्त भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून, येथे असलेल्या अनोख्या दत्त मंदिराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. कोल्हापूरपासून 48 किमी अंतरावर कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते विजापूरच्या आदिलशाह या मुस्लिम राजाने बांधले आहे.
मुस्लिम राजाची श्रद्धा आणि अनोखे वास्तुशिल्प
आदिलशाहने आपल्या अंध मुलीची दृष्टी परत मिळावी यासाठी प्रार्थना केली होती, आणि ती पूर्ण झाल्यानंतर त्याने या मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. मंदिराला पारंपरिक हिंदू मंदिरांप्रमाणे कळस नाही, तर गोल घुमट आहे, जो इस्लामिक वास्तुशिल्पाचा प्रभाव दर्शवतो.
दत्त मूर्तीऐवजी पादुकांची पूजा
या मंदिरातील आणखी एक विशेषता म्हणजे येथे दत्त महाराजांची मूर्ती नाही, तर दत्त पादुकांची पूजा केली जाते. नृसिंहसरस्वती स्वामींच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला “दत्त संप्रदायाची राजधानी” म्हणून ओळखले जाते.
भक्तांच्या गर्दीने गजबजलेली नरसोबाची वाडी
दरवर्षी दत्त जन्म सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर भागांतील हजारो भाविक नरसोबाच्या वाडीत येतात. या सोहळ्यात श्री दत्त महाराजांचा पाळणा मोठ्या थाटामाटात सोडला जातो आणि विशेष मंत्र पठण व पूजा-अर्चा पार पडते.
नरसोबाची वाडी हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे स्थान असून, भक्तांसाठी ते श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.