निवडणुकीत अथवा जीवनात मिळालेले यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहे. स्थानिक आमदार हे ठरवत नाही. असा टोला महाराष्ट्र राज्याच्या माजी महीला ब बाल विकास मंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यानी कर्जत खालापूर विधान सभा मतदार संघाचे महायुतीचे तथा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांना टोला लगावत असताना रोहा येथे पत्रकार यांच्याशी संवाद साधताना सांगितले.
अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, कर्जत खालापूर आमदार हे महेंद्र थोरवे काठावर उत्तीर्ण होवून वाचले. ते फार मोठे नसल्याने त्यांना मी त्यांना फारसे महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा आणि महायुतीच्या माध्यमातून विकास काम करावे. कुठलेही यश मिळाले असले तरी पाय जमिनीवर ठेवून राहावे किंवा मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी महायुतीमधील वाद चव्हाट्यावर येवू लागले आहे. रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दीक लढाई सुरु झाली आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर महायुतीला लागलेले कॅन्सर, महायुतीचे गद्दार ,महायुतीतील नासका कांदा आहेत, त्यांना वेळीच फेकून द्या. अन्यथा महायुती खराब होईल अशी टीका महेंद्र थोरवे यांनी केली होती.आदी गंभीर आरोप केले होते. त्याला आता सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.