नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांची उधळण केवळ स्वच्छतेवर केली जाते. का याबाबत एकदा का टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली की ठेकेदार सुध्दा काही लक्ष देत नसून दर महिन्याला कामाची बिले घेण्यासाठी आतुर असतात. घनकचरा व्यवस्थापन साठी तर काही कोटींच्या घरात ठेका दिला जातो परंतु त्याप्रमाणे कामे पूर्ण केली जात नाहीत असे नागरिकांमधून वारंवार बोलले जात आहे. संबंधीत ठेकेदाराला वेठीस धरून काही मंडळी आपले उखळ पांढरे करण्यात व्यस्त दिसतात. नेमून दिलेली कामे योग्य पद्धतीने केली जात आहेत किंवा नाही यावर अंकुश ठेवण्यासाठी नगरपरिषदेचा अधिकारी वर्ग हतबल दिसत आहे.
मागील काळात नगरपरिषदेने अनेकदा स्वच्छता अभियानात पारितोषिक प्राप्त केलेल्या या गावात सद्यस्थितीत स्वच्छता लोप पावत चालली आहे. विविध पॉईंट्स त्याचप्रमाणे महत्वाच्या ठिकाणी प्लास्टिक बाटल्या तसेच रौपेर्स जंगलात इतस्ततः पडलेले असते. सर्वच भागात कचराकुंड्या नसल्याने नाईलाजाने पर्यटक आपल्या जवळील प्लास्टिक कचरा आजूबाजूच्या जंगलात टाकत असतात. त्यामुळे इथली वनराई हळूहळू संपुष्टात येत आहे.
येथिल पर्यावरण अबाधित राहण्यासाठी स्वच्छता राखणे खूपच गरजेचे आहे, त्यासाठी नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणून लक्ष केंद्रित केल्यास इथली वनराई आणि निसर्ग सौंदर्य कायमस्वरूपी हरित राहील असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
——————————————————-
नगरपरिषदेने दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन ठेका संबंधित ठेकेदाराला देऊन एकप्रकारे ठेकेदाराला आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या काही मंडळींना पोसण्यासाठी हा ठेका काढला जातो की काय ? त्यापेक्षा एकवेळ येथील स्वच्छता दूत म्हणून कायम निस्वार्थी पणे स्वच्छता मोहीम राबवितात अशांना ही कामे दिल्यास नगरपरिषदेची मोठया प्रमाणावर आर्थिक बचत होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.