माथेरानमध्ये ई-रिक्षा पलटी: निष्काळजीपणे मोबाईलवर बोलत असलेल्या चालकामुळे अपघात

E Rikshaw Palati

कर्जत ( गणेश पवार ) :

माथेरानमध्ये “नो व्हेहिकल झोन” असल्यामुळे हात-रिक्षाच्या माध्यमातून मानवी वाहतूक चालवली जात होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता ई-रिक्षाचा वापर करण्यात येत आहे. अशाच एका ई-रिक्षाचा अपघात झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
अपघात घडला तेव्हा ई-रिक्षा क्र. १६ ही दस्तुरी नाका येथील ई-रिक्षा स्टँडकडे निघाली होती. त्यावेळी रिक्षामध्ये एक पुरुष, महिला, व एक लहान मुलगा प्रवास करत होते. चालक निष्काळजीपणे मोबाईलवर बोलत असताना, मायरा पॉईंट जवळील तयाब लॉजजवळ रिक्षा धक्क्याला लागून पलटी झाली.
घटनास्थळी प्रवाशांच्या आरडाओरडाने लोकांची गर्दी जमली. सीताराम कुंभार व संतोष पवार यांनी तत्काळ धाव घेत रिक्षा उभी केली व प्रवाशांना बाहेर काढले. अपघातामुळे एका पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून, चालकाच्या डोक्याला मार लागला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघाताचे मुख्य कारण चालकाच्या निष्काळजीपणाचे असून, मोबाईलवर बोलत असताना रिक्षाचा वेग नियंत्रित न राहिल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. माथेरानमध्ये ई-रिक्षा वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading