राज्य व केंद्र शासनाच्या अमृत २.० महा अभियान योजनेंतर्गत माणगांव उतेखोल जलशुद्धीकरण केंद्रात २.५ लाख लिटर पाणी क्षमतेचा एका एमबीआरचे (जलकुंभ) व १ लाख ६० हजार क्षमतेच्या एका टाकीचे काम वेगाने सुरू असुन नाणोरे (पूर्व), भादाव, येथे देखील दोन टाक्या असे एकुण चार जलकुंभ पाणी पुरवठा योजनेच्या नविन बांधकामास नोव्हेंबर २०२४ दिपावली नंतर वेगाने सुरुवात झाली आहे.
महाड पोलादपूर व माणगांवचे तत्कालीन आमदार व विद्यमान कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पाठ पूराव्यामुळे ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंजूर झाली साधारणतहा ५४ कोटी रुपयांची जिएसटी समावेष्ठीत अंदाजीत रक्कम यासाठी खर्च होणार असल्याची माहिती नगरपंचायत कडून सांगण्यात येत आहे.
माणगांव ग्राम पंचायतचे माणगांव नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगर पंचायतीमध्ये माणगांव, भादाव, खांदाड, उतेखोल, नाणोरे या गावांचा समावेश आहे. माणगांव नगर पंचायत हद्दीत कार्यान्वित असलेली नळपाणी पुरवठा योजना जुनी झाली असून, सदर योजनेतून नगर पंचायत हद्दीत सद्यस्थितीत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेत वेळो-वेळी बदल करण्यात आले आहेत.
आजपर्यंत ग्रामीण भागातील निकषानुसार प्रति माणसी प्रति दिन ४० ते ५५ लिटर प्रमाणेच शहरामध्ये पाणी पुरवठा होत आहे. नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नागरी क्षेत्रा मध्ये शासनाचे पाणीपुरवठा वितरण निकषानुसार प्रति माणसी प्रति दिन १३५ लिटर पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. माणगांव शहराची सन २०११ चे जनगणनेनुसार लोकसंख्या १८,७४० इतकी असून, मागील काही वर्षात शहराचे मोठया प्रमाणात नागरीकरण झालेले आहे.
शहरात वाढलेल्या नागरीवस्तींना पाणी पुरवठा करणे नगर पंचायतीचे कर्तव्य आहे. शहरात पाणी पुरवठा अस्तित्वातील वितरण व्यवस्था अपुरी पडत असून अनेक विभागात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी होत आहेत. काही विभागामध्ये उंच जलकुंभ घेवून वितरण व्यवस्था करणे गरजेचे होते. सद्या शहराचे काही भागामध्ये नदीवरती पंप बसवून विना शुध्दीकरण पाणी पुरवठा देखील होत असल्याने, तेथील नागरीकांना शुध्द पाणी पोहचत नाही. या सर्व बाबींचा विचार करता व उतेखोल येथील कार्यान्वित पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, नगरपंचायत हद्दीतील मौजे, माणगांव, खांदाड, मुंबई, गोवा हायवे महामार्गाचा नाणोरे गोद नदीपर्यंतचा परिसर (पूर्व भाग) व उतेखोल, भादाव, नाणोरे (पश्चिम भाग) अशी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येत असून शहरातील पाणी पुरवठयाबाबत भविष्यातील समस्या दूर होऊन शहरामध्ये नियमित स्वरूपात शुध्द पाणीपुरवठा करणे शक्य होऊन परिस्थिती मध्ये सुधारणा अपेक्षित असल्याने
माणगांव शहरातील जुनी पाईप लाईन देखील बदलून नव्याने एसडिपी लाईनचे काम पुणे कोथरूड येथील एस.के इंटर प्रायझेस मार्फत हे काम वेगाने सुरु करण्यात आले असून, जवळपास सुधारीत नविन जलकुंभ तसेच जलशुद्धी केंद्रातील फिल्टरेशन प्लाण्ट डागडुजी व रंगरंगोटीच्या कामाला देखील सुरुवात झाल्याने माणगांव शहरातील पाणी पुरवठा अधुनमधुन या कामांचे कारणास्तव विस्कळीत होणार असल्याने नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात जागोजाग खोदकामे सुरु आहेत. तसेच माणगांव खांदाड येथे संपूर्ण नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार असुन जॅकवेल, फिल्टरेशन प्लाण्ट एक एमबीआर व तीन टाक्या(जलकुंभ) नव्याने उभारल्या जात आहेत. हे काम पूर्ण झाल्या नंतर भुयारी गटार योजनेचा प्रकल्प अहवाल मंजूर असून ही योजना देखील राबविणे प्रस्तावित आहे.
माणगांव नगर पंचायतीची आर्थिक स्थिती पाहता सदर योजनेकरिता तसेच योजनेचा स्व: हिस्सा भरणे कामीसुध्दा नगर पंचायती कडे निधी उपलब्ध नसल्यामुळे १००% अनुदान मागणी साठी माणगांव नगर पंचायतीचे नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणेत आला तो मंजुर झाला, अमृत २.० महाअभियान अंतर्गत शासन परिपत्रक, अटी, शर्ती व सुधारणा करणे व सदर योजनेबाबत वेळो वेळी निर्गमित होणारे शासन निर्णयां नुसार सदर प्रकल्पाची अंमल बजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेत अनुदान मंजूर झाल्याने पाणी पुरवठा योजनेसाठी लागणारी जागा नगर पंचायतीने उपलब्ध करुन दिली, आणखी गरज भासल्यास आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून देण्यात येईल परंतु काही भागात यासाठी नागरिकांमधुन हरकती आल्याने या कामाला विलंब होत असल्याची माहीती देखील मिळत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.