गेले तीन दिवसांपासून पावसाने आपली हजेरी लावली आहे. माणगांव तालुक्यातील अनेक भागात आकाशात मळभ दाटले आहे. मंगळवार दि.६ मे रोजी रात्रीचे सुमारास सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरींनी घर अंगणात पागोळ्या गळत पाऊस पडला. बुधवार दि.७ मे सायंकाळचे सुमारास तो पुन्हा बरसला आहे. संपूर्ण परिसरात मातीचा सुगंध आणि पावसाने परिसरात वृक्ष वेलींवर साचलेली धुळ साफ झाली, वातावरणात थंडावा गार वारे वाहू लागल्याने उष्णतामानात घट झाली आहे.
गुरुवार दि.८ मे रोजी सकाळपासुनच आभाळ दाटून ढगांची गर्दी होऊन एक दोन हलक्या सरी बरसल्या. मे महिन्यात अर्थात वैशाख महिन्यात उमललेल्या बहावा गुलमोहराचा बहर पावसाच्या पडल्या सरींनी आणखीन खुलून आला. महिना भरावर मान्सून आला असतानाच वातावरण चक्क पावसाळी वाटत आहे. यंदा पाऊस जोरदार पडणार असल्याचे भाकीत व्यक्त होत आहे.
साधारणतहा काही नैसर्गिक संकेत जसे कि पाऊस जवळ आला कि दिसणारे मृगाचे मखमली किडे, प्रकाशाकडे आकर्षीत होत पंख गाळणारी वाळवी, चातक, कोकीळ पक्षांचे आवाज, विजांचा लखलखाट ढगांच्या मोठ्या गडगडाटाविनाच शांततेत आलेल्या अवकाळी पावसामुळे अजुन ही अंबा फणस झाडांवर पक्व होण्याचे स्थितीत असतानाचा फळपिकांचे संभाव्य नुकसानी बाबत चिंतेचा सूर उमटवत तो पडतोय. हवेत मात्र गारवा आल्याने जनतेमधुन त्याचे स्वागत होत, फक्त नुकसानदायक वादळी वाऱ्याविना, विजा न पडता तो असाच शांततेत यावा व बरसावा हेच बोलणे ऐकावयास मिळत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.