माणगांवमध्ये शिवशाही व रिक्षामध्ये भीषण अपघात, तीघांचा जागीच मृत्यू !

Accident Mangav
माणगांव :
मुंबई गोवा महामार्गावर माणगांव शहराजवळील मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण मयत झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. च्या सुमारास मानस हॉटेल जवळ शिवशाही बस क्र. एम एच ०९ एफ एल ०२४६ ही ठाणे वरून दापोलीकडे जात असताना रिक्षा क्र. एम एच ०४ एफ सी ६२८२ मध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे ,दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव सर्व राहणार ठाणे यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच माणगांव पोलीस टीम पो. ह. गणेश समेळ, सानप घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मयत यांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आणण्यात आले असून यावेळी सुरक्षारक्षक विवेक नितनवरे, नागेश दिपके यांनी सहकार्य केले. या घटनेचा पुढील तपास माणगांव पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading